Breaking News

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा सुरू न झाल्याने अंधारात...... मजुरांना आपल्या मुलाच्या शैक्षणिक भविष्याची चिंता...

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा सुरू न झाल्याने अंधारात...... मजुरांना आपल्या मुलाच्या शैक्षणिक भविष्याची चिंता... राज्यभरात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर आपल्या मुलाबाळांसह ऊस तोडणी साठी साखर कारखान्याच्या परिसरात दाखल झाले आहेत मात्र त्यांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा अजून सुरू झाल्या नसल्याने ऊस तोड कामगारांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यांतील अनेक जिल्ह्यातून ऊसतोडणी साठी मजूर स्थलांतर करत असतात त्यांच्यासोबत मुलाबाळासह कुटुंब कबिला असतो, गावाकडे कोणी नसल्याने ऊस तोडणीच्या ठिकाणी मुला बाळांना घेऊन ते राहत असतात गावाकडून आल्यानंतर जिल्हा परिषद आणि साखर कारखाने यांच्या माध्यमातून साखर शाळा सुरू केल्या जात असतात मात्र अजूनही राज्यातल्या अनेक जिल्ह्यात साखर शाळा सुरू झाल्या नसल्याचे वास्तव समोर आलाय त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे आम्ही मोलमजुरी करून जीवन जगत असलो तरी सरकारने आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी अशी कैफियत ऊसतोड कामगार मांडताना दिसत आहेत. आम्ही आयुष्यभर काबाडकष्ट केले गावाकडे मुलांना सांभाळण्यासाठी कुणी नसल्याने मुलांना सोबत घेऊन यावे लागते आम्ही ज्या कारखाना परिसरात राहतो त्या ठिकाणी आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची गरज आहे एकीकडे सरकार शिकाल तर टिकाल अशा घोषणा करत असते मात्र आमच्या मुलांच्या शिक्षणाचे काय असा प्रश्न होताच पालक विचारताना आपल्याला दिसतात..

Ishwar Marathe
5010
Share with your Friends

Advertisement

Trending News

Newsletter

Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd

Lorem ipsum dolor sit amet elit
Get In Touch

Purnia, Bihar, India

info@publicview.in

Follow Us
Copyright © 2025 @ Public View. All rights reserved.
Made with skill by Myindex Inc.