Breaking News

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मालिका उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. अशा प्रकारे सरकारचा विरोध व्यक्त केला.

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. सरकार आणि प्रशासनाला जागी करण्यासाठी आदिवासी पारंपारिक पद्धतीने अंतयात्रेसाठी वाजवले जाणारे तुर वाद्य वाजवत केला निषेध. धनगर समाजाला आदिवासीं मध्ये आरक्षण देऊ नये यासह विविध 21 मागण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने गेल्या आठ दिवसापासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उपोषण स्थळी आदिवासी परंपरेप्रमाणे अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या तुर वाद्य वाजत सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला आहे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नासाठी साखळी उपोषण सुरू असून प्रशासनाच्या वतीने एकही अधिकाऱ्यांनी आठ दिवसात उपोषणकर्त्यांची संपर्क केलेला नाही संवेदना मेलेल्या सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तूर वाद्य वाजवत अनोखे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची दखल न घेतल्यास वीस तारखे नंतर जिल्ह्यातून जाणारे दोघे महामार्ग रोखण्याचा इशारा उपोषण कर्ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख के टी गावीत त्यांनी दिला आहे.

Ishwar Marathe
5012
Share with your Friends

Advertisement

Trending News

Newsletter

Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd

Lorem ipsum dolor sit amet elit
Get In Touch

Purnia, Bihar, India

info@publicview.in

Follow Us
Copyright © 2025 @ Public View. All rights reserved.
Made with skill by Myindex Inc.